आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद या संस्थेची स्थापना दिनांक १९/०४/२००३ रोजी झाली. संस्थेची सुरुवात ३०० मुख्य व्यवस्थापक आणि ३ लक्ष रुपये भागभांडवलापासून झालेली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. सहकाररत्न अंबादास मानकापे दादा यांनी ३०० सभासदांना घेऊन संस्थेची सुरुवात केली. संस्थेचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद जिल्हा असून संस्थेचे कामकाज सभासदांमधून लोकशाही पद्धतीने, ठरावाव्दारे सर्वसंमतीने चालते.
दर पाच वर्षानंतर लोकशाही मतदान पद्धतीने सभासदांमधून संचालक मंडळाची निवड करण्यात येते. संचालकांच्या निवडीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची निवड होते. संस्था सुरु झाल्यापासून दरमहा संचालक मंडळ सभा नियमित घेण्यात येतात आणि दर महिन्याचे संस्थेचे विषय यामध्ये मांडण्यात येऊन सर्व संचालक मंडळाची त्यास मान्यता घेण्यात येते. मगच ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येते. संस्थेच्या विकासाबाबतचे नियोजन ठरविले जाते.